वैदिक शिक्षण

वैदिक शिक्षणाचे मानवी जीवनात महत्व

वेद हे ज्ञान सागर असून सर्वच ज्ञान शाखांचे उगम स्रोत आहेत. वेदांच्या अभ्यासाने व वेदातील प्रयोगांच्या सिद्धतेने मानवाचे जीवन सुख समृध्दी पूर्ण सहजच होऊ शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोणत्याही दुष्परिणामाविना दुर्धर रोगाची निवृत्ती करु शकणारा आयुर्वेद जो अथर्ववेदातून निर्माण झालेला आहे.

वेद हे मूलभूत विज्ञान आहे व त्या मध्ये सृष्टीरचनेचे, सृष्टीपालन व विनाश या संबंधीचे सर्वच ज्ञान सांकेतिक रुपाने शब्दबद्ध केलेले आहे. असे असल्याने त्याच्या अभ्यासाशिवाय अनुभूती येणे दुरापास्त आहे. यामुळेच मानवी जीवनात, मानवाच्या उत्क्रांतीत शास्त्रशुद्ध, सप्रयोग वैदिक शिक्षणाचे अपरंपार महत्त्व आहे. असे विषेश शिक्षण ओम एजुकेशन सोसायटी मार्फत दिले जाते.

mrMarathi