ब्रह्मांडामध्ये मानवाचे स्थान काय आहे हे विधात्याच्या भूमिकेतून समजून घेणे आवश्यक आहे. वेदांचा इतिहास पाहिला तर असे स्पष्ट होते की एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र अंधकार होता—सूर्य नव्हता, चंद्र नव्हता, नक्षत्र–तारांगण नव्हते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूतेही नव्हती. केवळ अंतराळ होते आणि सर्वत्र अंधकार पसरलेला होता.
ही कल्पना नसून, ऋग्वेदाने केलेले स्पष्ट वर्णन आहे.
अंतराळात एक अदृश्य शक्ती होती. ती दृश्यस्वरूपात नव्हती; पण सर्वत्र व्यापून राहिली होती. या शक्तीच्या मुखातून कालांतराने वेद प्रकट झाले, आणि वेदांमधून विष्णूची उत्पत्ती झाली.
विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव प्रकट झाले आणि ब्रह्मा–विष्णु–महेश यांच्या माध्यमातून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती झाली.
नद्या, पर्वत, निसर्ग, जीवसृष्टी—हे सर्व या दिव्य निर्माणकर्त्यांच्या संकल्पातून प्रगट झाले.
या संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व कार्ये स्वयंचलितासारखी, सुव्यवस्थित आणि नियमबद्धपणे चालतात.
जिवसृष्टीत मानवाला विशेष स्थान आहे कारण—
म्हणूनच मानवाच्या जीवनाकडून निर्माणकर्त्याची अपेक्षा काय आहे, याचा विचार करणे आवश्यक ठरते.
ब्रह्मांड ज्याने निर्माण केले तेच ते उद्ध्वस्त करून पुन्हा अदृश्य अवस्थेत विलीन करू शकते. या विश्वात फक्त निर्मात्याचीच इच्छा फलित होते, इतर कोणत्याही जीवाला काहीही बदलता येत नाही.
विध्वंसक निसर्गशक्ती—भूकंप, महापूर, बर्फकडा ढासळणे—यांनी पृथ्वी थरथरते. अशा वेळी मानवी विज्ञान किंवा शक्ती काहीही करू शकत नाहीत.
यातून हेच सिद्ध होते—
मानव हे ब्रह्मांड निर्मात्याच्या खेळातील एक घटक आहे.
हा खेळ असा आहे की—
या खेळात कोणताही एक देव श्रेष्ठ नसून, हा खेळ प्रत्येक जीवाच्या विवेकावर, साधनेवर आणि आत्मोन्नतीवर आधारित आहे.
नाथ शक्तिपीठाने प्रकाशित केलेल्या *आत्मोन्नती साधना* या ग्रंथात या तत्त्वांचे विस्तृत वर्णन आहे.
ही साधना —
ही उपासना नव्हे, तर अंतर्गत परिवर्तनाची साधना आहे.
माणूस जन्माला आला की मरणार ही ब्रह्मांडाची अपरिहार्य योजना आहे. पण त्या मधल्या जीवनाच्या प्रवासात अनुभवले जाणारे क्लेश कमी कसे होतील, हे या साधनेने साध्य होते.
प्रत्येक जीव पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाच तत्वांनी बनलेला असतो. या तत्वांमध्ये जे गुण आहेत तसेच अवगुणही आहेत आणि ते न कळत मानवाच्या जीवनावर परिणाम करतात.
आत्मोन्नती साधनेने—
८८) ब्रह्मा–विष्णु–महेशाची होईल कृपा, लाभेल सेवा सद्गुरूंची! जीवनातील कुयोग जाऊनी, होईल कृपा पंचमहाभूतांची!
८९) पंचमहाभूतांचा परिणाम, न कळत होईल जीवनावर! बदलूनी ग्रहयोग जीवनाचे, आयुष्य जाईल सुख–समाधानाचे!
९०) करित रहा अनेक पुरश्चरणे या बोधाची! जाणशील तू परमार्थ, अन होशील विवेकी!
९१) सात वारांचा हा बोध, श्रवणाद्वारे घ्यावा शोध! मनन करता नित्य–नित्य, विषद होतो जीवनार्थ!
या साधनेने —
आत्मोन्नती ही प्रत्येक जीवाची अनिवार्य आध्यात्मिक यात्रा आहे—ती केलीच पाहिजे आणि तिची अनुभूती घेतलीच पाहिजे.