आयुष्यात जवळच्या व्यक्तिने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक, माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात.
वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही. तो थांबतो, वेळ जाऊ देतो, अन पुन्हा एकदा बाहेर पडतो— घेऊन तीच भरारी, तीच दहशत आणि तोच दरारा!
जरा विचार करा— पराभवाने माणुस संपत नाही; प्रयत्न सोडतो तेंव्हा तो संपतो.
कठीण काळात सतत स्वतःला सांगा: “शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही…“
जिंकण्याचा सतत प्रयत्न करा. भेकड होऊ नका, रडत बसू नका.