नाथशक्तीपीठ, अकोला येथे कालसर्प दोषासह इतर अनेक ग्रहपीडांच्या निवारणासाठी 'ग्रहग्रहण पूजा' अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केली जाते. हे ग्रहग्रहण पूजा विधान हे प. पु. नरेंद्रनाथ महाराजांच्या कृपेने आणि वेदांच्या शास्त्रीय अभ्यासाच्या माध्यमातून मानवाच्या सुख शांती प्राप्ती आणि प्रगती साठी तयार केले गेले आहे. इतत्र केल्या जाणाऱ्या ग्रह शांती पूजा आणि नाथ शक्तिपीठ येथून केल्या जाणरी ग्रहग्रहण पूजा ह्या पूर्णतः वेगळ्या आहेत आणि त्याचे फळ सुधा पूर्णतः वेगळे आहे.
ग्रहग्रहण पूजा ही प्रामुख्याने मानवी जीवनातील पूर्वसंचित आणि प्रारब्धामुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी केली जाते. ज्या कोणत्या दोषामुळे जीवनात सतत क्लेश, अपयश किंवा अडथळे येतात, त्या व्यक्क्तगत दोषांचे निराकरण करणे हा या पूजेचा मुख्य उद्देश आहे.